Posts

Showing posts from 2011

मलाही काही बोलायचंय..................

Image
                                                  १३ जुलै ,२०११, बुधवार. मी आणि माझी मैत्रीण - प्रज्ञा आम्ही अंधेरीला सहजच शॉपिंगसाठी म्हणून गेलो होतो.प्रज्ञा तिला आवडलेला टी शर्ट पहाण्यात व्यस्त होती. मीही तिला थोडीफार मदत करत होते. तितक्यात आम्ही ज्या दुकानात खरेदी करत होतो तिथल्या दुकानदाराला बाजूच्याच दुकानदाराने येऊन सांगितले की " अरे यार कहीपे तो बोंब फुटा है रे.अभी मुझे फोन आय था.नसीब अच्छा जो यहा नही हुआ.पट नही क्या होगा? " माझ्या कानांनी ही गोष्ट पटकन ऐकली. तो मनुष्य ही एवढी गंभीर गोष्ट अगदी मस्त हसत सांगत होता.त्याच्या चेहऱ्यावर जराही कसलं करूण भाव नव्हते वा कसलं गांभीर्य नव्हत.मला थोड आश्चर्य वाटलं. मी आणि प्रज्ञा काहीच न विचारता तिथून निघालो. दोघीनीही असाच ग्रह बांधला की तो मनुष्य असाच काहीतरी बरळत असेल. कारण ही बातमी खरी असती तर त्या मनुष्याच्या चेहऱ्यावर काहीतरी चिंता दिसली असती ( अशा संवेदनशील परिस्थितीत टी दिसावी अशी एक माफक अपेक्षा आपण करतो, एक संवेदनशील माणूस म्हणून ) किंवा  घरून कोणाचातरी किंवा मित्र- मैत्रिणींपैकी कोणाचातरी फोन किंवा संदेश आल

दमलेल्या पालकांची कहाणी........

Image
                                    मध्यंतरी संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचं, 'दमलेल्या बाबाची कहाणी तुला' हे गाणं ऐकण्याचा योग आला. या गाण्यात कामाच्या भारामुळे आपल्या मुलीला वेळ न देऊ शकणारया वडिलांच्या मनातली खंत, तळमळ, वेदना उत्कृष्टपणे संगीतकारांनी श्रोत्यांसमोर आणली. खर तर, ही गोष्ट फक्त त्या गाण्यापुरती मर्यादित नाही. आज आपल्या आजूबाजूला आपल्याला असे अनेक आई-बाबा दिसतील ज्यांना  आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, त्यांच्यासोबत चार गोष्टी करण्यासाठीही वेळ नाही. आणि त्यामुळेच आजकालचे बरेच ऑफिस गोईंग स्त्री - पुरुष पालक असमाधानी दिसतात.                                                                      याच विषयावरचा एक लेख वाचनात आला. ऑफिसला जाणारया पालकांना आपल्या पाल्याकडे हवं तितकं लक्ष आणि वेळ देता येत नाही,या विषयावर हा लेख होता. ह्या लेखात जी आकडेवारी मांडली होती त्यानुसार एका सर्वेक्षणात असं दिसण्यात आलं की, आजच्या युगातील बहुसंख्य नोकरदार पालक, त्यांना स्वतःच्या मुलांसोबत हवा तितका वेळ घालवायला मिळत नाही म्हणून असमाधानी आहेत. या सर्वेक्षणातील ९१%पालकांनी

एक विचारपूर्ण प्रवास.............

                        सकाळची साधारण पावणेसातची  वेळ.व्ही.टी स्टेशनवर हमालांचा,प्रवाशांचा,तिकीट तपासणारया टी.सीन्चां नुसता गलबलाट चालू होता.मडगाव एक्स्प्रेस निघून जाऊ नये म्हणून मी आणि आई आम्ही झपझप चालत होतो.आदल्याच दिवशी माझी लास्ट ईयर ची परीक्षा संपल्याने आम्ही गावी जात होतो.गावाला जाताना एक वेगळाच आनंद मनात असतो.      आम्ही धावत होतो.तिकीट आयत्या वेळी काढले असल्याने मी आणि आई आम्ही जनरलच्या डब्ब्यात चढणार होतो.आम्ही कशाबशा आत चढलो.बघतो तो काय,आधीच सर्व सीट्स फुल्ल झाल्या होत्या.माझ्या कपाळावर जरा आठ्याच पडल्या.मग मी बसण्यासाठी दुसरा पर्याय शोधू लागले.मुख्य आसनाच्या वर लांबपल्ल्यांच्या गाड्यांमध्ये काही फळ्या ठोकलेल्या असतात,ज्याचाही बसण्यासाठी वापर केला जातो.मी आईला त्यावर बसायला सांगितले आणी मी खाली उभी राहिले.आता उभं राहून करायचं काय?तितक्यात handbag  मध्ये असलेल्या ' Wise & Otherwise ' ची मला आठवण झाली.तितक्यात गाडी सुटली.गाडी ठीक वेळेवर सुटली म्हणून मला जरा हायसं वाटलं.                  छान हवा येत होती.जरा थंड वाटू लागलं होत.बायकांच्या एवढ्या गराड्यात,जागेसा